पहिला पाऊस

उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीवर पहिला पाऊस पडला ती तापलेली माती जी गंध घेऊन उठते त्याला तोड नाही. एका खोलीत बसून तो घ्यायचा नसतो. तो अनपेक्षित रीतीने यावा लागतो आणि तो वास घेताना उघड्यावर जाऊन तृप्त धरतीची तृप्तीही डोळे भरून पहावी लागते. उन्मत्त ढगातून वीज खेळायला लागल्यावर तिचा संचार तरुण शरीरातही व्हावा यात काय आश्चर्य? त्या जलधारात … Read more

आणि मी चेअरमन झालो

आमच्या चिंचखरे ब्लॉक्सच्या "फ्रेंड्स ओन बॅडमिंटन क्लब" चे आपण अध्यक्ष व्हा असं सांगायला जेव्हा काही तरूण मंडळी आली तेव्हा मला धक्काच बसला. चिंचखरे ब्लॉक्समधे आम्ही रहायला येऊन आता बरेच दिवस झाले होते. ही अध्यक्षपदाची विनंती करायला आलेली तरुण मंडळी हां हां म्हणता तरूण झाली होती . विशेषताः गुप्तेकाकांची निमा तर भलतीच स्मार्ट दिसत होती .“काय … Read more

कसं काय, बरं आहे !

….साऱ्या व्यवहारात "कसं काय" या सारखा निरर्थक प्रश्न आणि "बरं आहे" यासारखं निरर्थक उत्तर नाही. ह्या शब्दाला निश्चित असा अर्थ नाही, कळा नाही, चव नाही. एखाद्या वृद्ध माणसाची आपण चौकशी करतो, "काय अण्णा साहेब, काय म्हणतेय प्रकृती?" त्यावर वय सत्तर वर्षे, 500 रुपये पेंशन, सर्व मुले कमावती, मुलींची लग्न बिनहुंड्याने झालेली असं सविस्तर उत्तर मिळतं. … Read more

दर्शनमात्रे – सुनीता देशपांडे

आता बाबाही थकले, आम्हीही थकलो. पण एक काळ असा होता की त्या वेळी आनंदवनात वर्षातून निदान एक तरी फेरी होतच असे. प्रत्येक वेळी आम्हांला काहीतरी नवं दाखवायची योजना बाबांच्या मनात असे आणि त्या उत्साहातच ‘आनंदवन – कुटुंबियांकडून स्वागत होई. हा भाग्यलाभ आमच्या भाळी लिहिला गेल्याचा पोटभर आनंद घेऊनच आम्ही परत कधी यायचं तो बेत ठरवून … Read more

यक्षाचं तळं

प्रत्येक सुखाला, दुःखाला संदर्भ असतात. या धामापूरच्या तलावालाही माझ्या जीवनात, स्मृतीत संदर्भ आहेत. प्रत्यक्षात मी त्या तलावाच्या पोटात गेले तर मृत्युनंतर तरंगत वर येणाऱ्या माझ्या ऐहिक मेंदूबरोबर ते संदर्भ नाहीसे होतील की त्या जलाशयाच्या गर्भाशयात पुनर्जन्मासाठी, पुनर्निर्मितीसाठी, दुगदुगत राहतील? तिथे त्यांना पोसणारी नाळ कोणती? असंख्य दुःखतांनी सासुरवाशिणींनी, चोचीतच दुखावलेल्या राजबंशी पाखरांनी

आठवणीतील पु.ल. – मंगेश पाठक

पुलंच्या निधनानंतर साहित्य किंवा चित्रपटसृष्टी- प्रमाणेच आणखी एक मैफल सुनी झाली. ती साहित्यिक गप्पांशी किंवा वाङमयीन वैशिष्ट्यांशी संबंधित नाही, पुलंच्या धमाल विनोदी नाटकांशीही संबंधित नाही. ही मैफल आहे कायमस्वरुपी स्मरणात राहणाऱ्या पुलंच्या फिरक्यांची ! वेळोवेळी संधी मिळेल तिथे पुलं हास्याची कारंजी फुलवायचे. त्यांच्या धमाल विनोदांमुळे आणि कोट्यांमुळे छोट्या वाटणाऱ्या अनेक गाठीभेटीही अविस्मरणीय

रोज एक . . . – उरलंसुरलं

मेहेरबाण संपादक ‘ अणिल ‘ यास संभा नाभाजी कोतमिरे याचे प्रेमप्रूर्वक दंडवत …अनंतचतूर्दशीला श्री. गनरायाचे वीसर्जण केले आनी तुम्हास हे पत्र लीहावयास बसलो आहे. खरोखर त्या दाहा दीवसांत शेकेट्री म्हनून माला जे अणुभव आले ते तुम्हांला दाहा पुस्तके वाचूण सूधा येनार नाहीत. आपल्या देशात जे जे काही चालत आहे — ज्या ज्या भयंकर गोस्टी घडत आहेत त्या … Read more

वेध सहजीवनाचा !

‘आहे मनोहर तरी’ या आत्मलेखनातून सुनीताबाईंनी पुलंसोबतच्या सहजीवनाचा वेध घेतला आहे. त्यांच्या लेखनशैलीचा हा एक संक्षिप्त परिचय…भाई आणि मी. दोन क्षुल्लक जीव योगायोगाने एकत्र आलो. त्यानंतरचा आजपर्यंतचा आयुष्याचा तुकडा एकत्र चघळताना अनेक लहानमोठी सुखदुःखे भोगली. कधीतरी हे संपून जाईल. राहिलीच तर भाईची पुस्तके तेवढी, त्यांचे त्यांचे आयुष्य सरेपर्यंत त्याच्या मागे राहतील. (adsbygoogle =